पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" महिला सुरक्षा " - एक मृगजळ

इमेज
भारतात शेकडो वर्षांपासून " महिला सुरक्षा " हा विषय काळजीचा राहिला आहे.१९४७ पुर्वी परकीय आक्रमणापासून महिला सुरक्षित नव्हती आणि १९४७ नंतर स्वकीयांपासून सुरक्षित नाही.अनेक पूजनीय महिलांनी स्त्री सबलीकरण - सक्षमीकरण - सुरक्षा यासाठी संघर्ष केलेला आपल्याला माहिती आहे.यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे.देश परकीय सत्तेतून मुक्त झाल्यानंतर देशात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत " महिला सुरक्षा " हा विषय फक्त मत मिळविण्यासाठी प्रकर्षाने मांडला गेला.कठोर कायदे फक्त कागदावरच लिहिले गेले.त्याची नीट अंमलबजावणी न झाल्याने त्या कायद्याच्या विषयी मनात भीती निर्माण झाली नाही.त्यामुळे दरवर्षी देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.आत्ता पण लग्नाचे वय वाढविणारा कायदा येऊ घातला आहे.यामुळे लवकर लग्न न होता. मुलीला तिच्या आवडत्या क्षेत्रात चांगले शिक्षण घेता येईल आणि देशाच्या प्रगतीस हातभार लावता येईल..... पण.... " महिला सुरक्षा " देशासाठी मृगजळ ठरणार का....? भारतीय पुरुष आपल्या पुरुषी अहंकाराचा विचार सोडू शकतो का...? भारतीय सरकारच्या येणाऱ्या नवीन क...

दुर्लक्षित पुर्वांचल तरीही प्रेमळ पुर्वांचल ♥️

 पुर्वांचलात नशिबाने नागालँड आसाम मेघालय अरुणाचल या राज्यात फिरण्याचा योग आला...    तिथले खानपान , वेशभूषा , वातावरण हे महाराष्ट्रापेक्षा खूपच वेगळे आहे. टुव्हिलर वर फिरत असल्याने गावातील वातावरण , माणसं जवळून पाहता आले.भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत इथे आर्थिक प्रश्न खूप गंभीर आहेत.मिशनऱ्यांचे जाळे आठही दिशांना पसरलेले आहे.आता हेच बघा ना एका रविवारी आम्ही नागालँड मध्ये होतो , आदल्या दिवशी समजले कि उद्या बाजार बंद असतो.फक्त जीवनावश्यक वस्तूंचे दुकानं उघडे असतात.आम्हाला वाटले की फक्त शहरात असे असेल म्हणून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.पण संपूर्ण दिवसभराच्या प्रवासात साधा चहा पण नाही मिळाला.रविवारी सगळे चर्चमध्ये जातात , सुट्टीचा वारी अशाप्रकारे कडकडीत बंद पाळणारे पहिल्यांदाच पाहिले.पण सुट्टी कसली तर चर्चमध्ये जाऊन देवाची प्रार्थना करण्यासाठी.इतकी कट्टरता तर मी मालेगावात पण पाहिली नाही.व्यवसायाचे नुकसान झाले तरी आम्ही धर्माचे रितीरिवाज सोडणार नाही. खूप प्रेमळ स्वभावाची माणसे या राज्यांमध्ये राहतात.पूर्णपणे मातृसत्ताक पद्धती असलेली ही राज्ये.सगळी कडे मुक्तपणे महिलांच...